परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर दणका युरोपियन्सना, चपराक विदेशी माध्यमांना
जागतिक राजकारण : "कुलतारान्ता टॉक्स"' आणि स्वाभिमानी परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सारीपाटावर भारतीय भूमिका आता केवळ मूक प्रेक्षकाची राहिलेली नसून, ती जागतिक समीकरणांना नवी दिशा देणाऱ्या एका खंबीर आणि आत्मविश्वासयुक्त झालेली आहे. फिनलँडमध्ये दिनांक 11 जून रोजी आयोजित "कुलतारान्ता टॉक्स"' (Kultaranta Talks) दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी घेतलेली भूमिका याचा प्रत्यय देणारे ठरले आहे. 'इमर्जिंग पॉवर्स अँड द न्यू जिओपॉलिटिकल कॉम्पिटिशन' (उदयोन्मुख शक्ती आणि नवीन भू-राजकीय स्पर्धा) या विषयावरील सत्रात त्यांनी पाश्चात्य देशांच्या दुटप्पी धोरणावर अत्यंत संयत, पण तितक्याच धारदार शब्दांत बोट ठेवले. मुद्दा प्रतिवादा पुरता मर्यादित नव्हता, तर बदलता सामर्थ्यशाली भारताच्या जागतिक धोरणाचा प्रत्यय देण्याचा होता. युरोपियन शस्त्रास्त्रांचा विरोधाभास आणि जागतिक तेल बाजाराचे वास्तव रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून पाश्चात्य देश भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी थांबवावी यासाठी सातत्याने दबाव आणत आहेत. फिनलँडमधील परिषदेत एका युरोपियन पत्रकाराने भारताच्या या भूमिकेवर प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना एस.जयशंकर यांनी नैतिकतेचे धडे देणाऱ्या युरोपला आरसा दाखवला. ते म्हणाले की, कोणत्याही युरोपियन देशावर भारतीय शस्त्रांनी कधीही हल्ला झालेला नाही, पण दुर्दैवाने युरोपीय शस्त्राचा वापर भारताच्या सुरक्षेवर घाला घालण्यासाठी लावण्यासाठी केला जातो. हा रोख थेट देशाच्या सीमेलगत शेजारील देशांना पाश्चात्य देशांकडून मिळणाऱ्या मदतीकडे होता. यासोबतच भारताच्या तेल खरेदीवर टीका करणाऱ्यांना त्यांनी जागतिक बाजारपेठेतील गणिते अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितली. युक्रेन युद्धानंतर युरोपियन देशांनी रशियावर निर्बंध लादले आणि स्वतः मध्यपूर्वेतील (Middle East) देशांकडून तेल खरेदी करण्यास सुरुवात केली. युरोपियन देशांनी तिथला साठा मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यामुळे भारताला नैसर्गिकरित्या उपलब्ध आणि परवडणाऱ्या रशियन तेलाकडे वळावे लागले. मोठा धोरणात्मक खुलासा करताना एस. जयशंकर म्हणाले, २०२२ मध्ये रशियावर निर्बंध लागल्यानंतर जागतिक बाजारात तेलाचा तुटवडा निर्माण होऊन महागाई वाढू नये आणि बाजार स्थिर राहावा, यासाठी स्वतः अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदी सुरू ठेवण्यास सांगितले होते. जर भारताने रशियन तेल खरेदी केले नसते, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्या असत्या, ज्यामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली असती. त्यामुळे भारताचा हा निर्णय जागतिक बाजारात स्थिरता आणणारा ठरला. यात कोणतेही राजकारण नव्हते. •युरोपियन मानसिकता आणि आंतरराष्ट्रीय माध्यमसृष्टीला चपराक आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा युरोपियन देश आणि तिथली माध्यमे स्वतःला शांततेचे आणि मानवाधिकारांचे एकमेव रक्षक म्हणून सादर करतात आणि अन्य देशांवर नैतिक दबाव आणतात. मात्र, जयशंकर यांनी अतिशय संयमी भाषेत युरोपच्या या धोरणातील विसंगतीवर बोट ठेवले. युरोप जेव्हा रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून भारताच्या भूमिकेला 'नैतिक दृष्ट्या चुकीचे' ठरवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा स्वतः युरोप कोट्यवधी डॉलर्सची शस्त्रे अशा देशांना विकतो ज्यामुळे भारताला धोका वाढतो. भारतकेंद्रित विश्लेषण: नव्या भारताची 'स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी' (धोरणात्मक स्वायत्तता) या संपूर्ण घटनेचे भारतकेंद्रित विश्लेषण केल्यास आपल्याला एका नव्या भारताचे दर्शन होते. राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य: भारताचे परराष्ट्र धोरण आता कोणत्याही विचारसरणीचे किंवा जागतिक महासत्तेचे गुलाम राहिलेले नाही. देशाची ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य हेच भारताचे मुख्य ध्येय आहे. पाश्चात्य देशांच्या दबावापुढे न झुकता रशियाकडून तेल खरेदी करण्याचा निर्णय हा याच 'राष्ट्र प्रथम' धोरणाचा भाग आहे. दुटप्पीपणाचा बुरखा फाडला: भारताने जागतिक मंचावर हे स्पष्ट केले की, युरोप स्वतःच्या हितासाठी कायदे बदलतो आणि इतरांना मात्र तत्त्वांचे धडे देतो. भारताने घेतलेल्या या खंबीर भूमिकेमुळे आज आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देश भारताकडे आपला एक खंबीर आधार म्हणून पाहत आहेत. परिपक्व आणि समतोल मुत्सद्देगिरी: भारताची भूमिका केवळ विरोधाची नाही. एका बाजूला पाश्चात्य धोरणांमधील त्रुटींवर बोट ठेवतानाच, एस.जयशंकर यांनी युरोपियन युनियन आणि फिनलँडसोबतच्या आर्थिक, तांत्रिक आणि व्यावसायिक संबंधांचे स्वागत केले. म्हणजेच, मतभेद बाजूला ठेवून देशाच्या विकासासाठी आवश्यक असणारे व्यापारी करार पुढे नेण्याची परिपक्वता भारताने दाखवली आहे. •बदलत्या जागतिक व्यवस्थेतील भारताचे स्थान 'कुलतारान्ता टॉक्स'मधील एस. जयशंकर यांचे वक्तव्य म्हणजे केवळ एका विशिष्ट प्रश्नाला दिलेले उत्तर नव्हते, तर तो बदलत्या जागतिक व्यवस्थेत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या एका नव्या भारताचा हुंकार आहे. भारत आता कोणत्याही जागतिक महासत्तेच्या अवाजवी प्रभावाखाली न येता, अत्यंत व्यावहारिक आणि राष्ट्रकेंद्री पावले टाकत आहे, हे यातून स्पष्ट होते.जागतिक मंचावर पाश्चात्य देशांच्या पारंपरिक दबावाला झुगारून, पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि शांतपणे स्वतःची भूमिका मांडण्याची भारताची ही नवी शैली कमालीची प्रेरणादायी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले हितसंबंध जपतानाच, कोणाशीही पूर्वग्रह न ठेवता संवाद साधण्याची ही परिपक्व मुत्सद्देगिरी आगामी काळात देशाला जागतिक राजकारणात एका नव्या उंचीवर जाण्यासाठी उपयुक्त ठरेल. _ *मकरंद मुळे©*, ठाणे पत्रकार, विश्लेषक दि. 12 जून 2026

बारामतीतली डेअरी लाटण्यासाठी प्रमोद गोयंकाला गायब केलंय का?

Maharashtrian Unique-Style BHINDI Recipe | Shengdanyachi Bhendi | शिंदान्याची भिंडी | Sanjyot Keer

काँग्रेस मध्ये विलीनीकरण, मग बोंबलला का वर्धापन दिन?

Explainer Katta: USA कडून भारतीय जहाजं टार्गेट ? ३ जणांचा मृत्यू, तरी माफी नाही, नेमकं घडतंय काय ?

Jaishankar exposed western Journalist: पानी का गिलास उठाकर जयशंकर ने डुबोए कई देश,हिले सारे पत्रकार!

'Far more that we don't know' about Iran deal than we do know: Fmr. Amb.

Mumbai के Ghatkopar में एक सफेद लाइन को लेकर आमने-सामने आए Jain, Marathi लोग, क्या है पूरा मामला?

80000 आतंकियो का सफाया कैसे हुआ, पाकिस्तानी संसद में महिला सांसद ने सारा खेल बदल दिया!

Israeli Prime Minister Netanyahu Statement

भारत से POK तक का सफर | KERAN VALLEY KASHMIR

Modi On Mute? | Govt Helpless As America Kills Three Indian Sailors In Hormuz | Akash Banerjee

Sen. Padilla reacts to report WH considered suspending habeas corpus for undocumented immigrants

The Match That Made Brazilians Hate Germany

China DEFEATED Kissinger's secret plan. I'll explain how!

America Warns India: अमेरिकेसमोर भारत इतका हतबल कधीच नव्हता

Latest on U.S.-Iran deal as Trump says text will be released "sometime after Friday"

