मुसळधार पाऊस आणि घनदाट धुक्यात हरवलेला " रांगणा गड " । एक अविस्मरणीय अनुभव#RanganaFort #SoloTrekking
मुसळधार पाऊस आणि घनदाट धुक्यात हरवलेला " रांगणा गड" रांगणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्हयातील एक किल्ला आहे.किल्ले रांगणा उर्फ प्रसिध्दगड सहयाद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या, पण घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर तसेच देश, कोकण व गोवा यापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. छत्रपतींच्या आवडत्या किल्ल्यामध्ये याचा समावेश होता, म्हणूनच १७८१ च्या एका ऐतिहासिक कागदपत्रात, ‘येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल’ असा उल्लेख आलेला आहे. गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हयात असलेल्या १३ किल्ल्यांमध्ये रांगण्याचा पहिला क्रमांक लागतो. इतिहास रांगणा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते. १४७० मध्ये तो महंमद गवानने जिंकला. त्यावेळी महंमद गवानने काढलेले उद्गार होते, ‘अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला. त्यात मर्दमुकीबरोबर संपत्तीही खर्च करावी लागली’. बहामनी साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा किल्ला अदिलशाहीत आला. शिवकाळात अदिलशाही सरदार सावंतवाडीचे सावंतांकडे हा गड होता. सन १६५८ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तम जमानने हा गड सावंताकडून घेतला. शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी रुस्तम जमानकडून हा किल्ला घेतला. पुढे अदिलशहाने रांगण्याविरुध्द मोहिम उघडली. त्यावेळी छत्रपती आग्य्राला कैदेत होते. स्वराज्याच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. अशा बिकट प्रसंगी स्वतःजिजाबाईंनी खास मोहिम काढून दि १५/०८/१६६६ रोजी रांगणा जिंकला. ही एक अद्भुत घटना रांगण्याचे स्वराज्यातील महत्त्व अधोरेखीत करते. दि १७/०८/ १६६६ रोजी महाराजांनी आग्य्राच्या कैदेतून पलायन केले. १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो. औरंगजेबाला दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही. वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला. शाहू - ताराबाई संघर्षात पन्हाळयावरुन निघून ताराबाई या गडावर वास्तव्यास आल्या होत्या. सन १७०८ मध्ये सातारकरांनी गडास वेढा दिला, त्यावेळी ताराबाईला सिंधुदुर्गावर पाठवून रामचंद्र पंत अमात्यानी व पिराजी घोरपडे यांनी किल्ला ३ महिने लढविला. पावसाळा सुरु झाल्यामुळे छत्रपती शाहूनी वेढा आटोपता घेतला. सावंतवाडीकरांवर कायम दबाव ठेवण्यासाठी करवीरकराच्या दृष्टीने रांगण्याला विशेष महत्त्व होते. सावंतवाडीकरांच्या वतीने जिव्हाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा हस्तगत केला होता. परंतु करवीरकरांचा निधडया छातीचा वीर सुभान यशवंतराव शिंदे यांनी अडीच महिने झुंज देऊन गड हस्तगत केला. करवीरकरांचे महास्थल म्हणून या गडाचा उल्लेख त्यावेळच्या कागदपत्रात वारंवार येतो. पुढे सावंतवाडीकरांनी करवीरकरांशी एकनिष्ठ राहाण्याचे ठरविले व रांगणा इंग्रजाचे राज्य येईपर्यंत करवीरकरांकडे राहिला. Follow us - Email - [email protected] Instagram / sanchitthakurvlogs__ Facebook - / sanchitthakurvlogs #MusaldharPausAniGhandatDhukyatharvlelaRanganGad #RanganaFort #RanganaGad #RanganaKilla #Kudal #Narur #Trekking #Trek #SoloTrekking #Forts #Kille #Gad #Konkan #रांगणागड #रांगणा #MonsoonTrek

आचरा दीपगृह । Achara Lighthouse । Hidden Kevandale Beach 🌩️ । How to Go by bike/boat ❓। कसं जायचं❓

कोकणची जगप्रसिद्ध आंगणेवाडी जत्रा 2024,लाखो भक्तांनी भरली भराडी देवीची जत्रा । जत्रा फिरायची मज्जा😍

वेंगुर्ल्यात इतकं सगळं आहे? 😲 | Vengurla | Redi Ganpati, Vetoba, Lighthouse & Dutch Factory | Ep 04

Part 1: कर्णाचा सतरा वेळा पराभव करणारा भीम होता | Nilesh Oak | Boys Talk | Maithily Apte | AarPaar

अस्सल गावठी आठवडी बाजार कुडाळ | Kudal Gavthi Athawadi Bazaar | ऑरगॅनिक शेतमाल #कोकण #शेती #गावठी #yt

🌧️😍गावातला मुसळधार पाऊस | HEAVY RAIN VILLAGE WALK🚶♂️| 4K HDR😍❤️

Raja Shivaji: खरा इतिहास का लपवला? shivaji maharaj vs aurangzeb धक्कादायक पुरावे!

कोकणात जोरदार पाऊस,महापूर,अतिवृष्टी,आभाळ कोसळलं,पुराचं पाणी गावात आणि शेतीत 2024

Highest peak of Maharashtra॥कळसुबाई शिखर॥ #shiledarsahyadrichavlog #kalsubaitrek

क्वांटम फिजिक्स म्हणजे काय? | सर्वात रहस्यमय जग

'आमच्या गावात आम्हीच सरकार' म्हणणाऱ्या मेंढालेखाची कहाणी | देवाजी तोफा मुलाखत | महाराष्ट्राची गोष्ट

Why Sangli Street Food is Still Underrated?

कोकणातील पारंपारिक पद्धतीने देवीचा त्रैवार्षिक गोंधळ।आईचा जोगवा,जागरण,स्त्रियांचे उखाणे,सावंत कुटूंब

कोकणातील सुंदर बेट,जमिनीवरील चारही बाजूने पाणी असलेला स्वर्ग Island konkan नदीतील खोत जुवा बेट

Bhaja Caves | Lohagad Fort | Lonavala Tourist Places | Maharashtra Tourism | Manish Solanki Vlogs

कोकण - कुडाळच्या बाजारात फेरफटका आणि चुलीवर बनवली पिठलं भाकरी 🛍️❤️ | Kokan Village Vlog #kokan

कोकणातील अनोखी देवमाळ्यातील 'देवशेती' 300 एकरात फक्त झऱ्याच्या पाण्यावर होते पारंपारिक वायंगणी शेती

सोमवारी भरणारा बांदा आठवडी बाजार #banda_market #kokan #mi_dodamarg_kar

Elephanta caves : घारापुरीच्या उत्खननात सापडलेल्या या ताम्रपटांमुळे कोणतं रहस्य उलगडलं? |

