भाजपाचा प्रभाव रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणातून 'गायब' होणार एक पक्ष ! काळ मागे फिरला !!
#maharashtrapolitics #marathibatmya #abpnews #abpmajha #pudharinews #maharashtratimes #loksatta #pudharinews #ajitpawar #mahayuti #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #ncpmaharashtra #shodhnewsmarathi #ashokgodage #uddhavthackeray #rajthackeray #marathinews18 #tv9marathi #samana #sanjayraut #pandharpurpolitics #solapurpolitics #dhananjaymunde भाजपाचा प्रभाव रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणातून 'गायब' होणार एक पक्ष ! काळ मागे फिरला !! दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन आणि विलीनीकरण झालंच नाही, काही महिने चर्चा झाल्या आणि त्यावर पडदा पडला... परंतु राज्याच्या राजकारणात आता सर्वात मोठी घडामोड घडू लागली आहे... शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेस मधूनच झालेला आहे.... आणि हीच राष्ट्रवादी आता काँग्रेस पक्षात विलीन होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.... शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या वर्ष दीड वर्षात... कायमच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनीही त्यांच्या अखेरच्या काळात विलिनीकरणाच्या दृष्टीने पावले टाकली. परंतु अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी विलिनीकरणास विरोध केल्याने दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमीलन होऊ शकले नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुढील भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित होतो. याच कारणास्तव काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा पर्याय राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना वाटत असावा..., पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरू असतानाच शरद पवार यांची राष्ट्रवादीही काँग्रेस पक्षात विलीन करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.. या विलीनीकरणासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन विलीनीकरण करण्याची तयारी दाखवत काही अटीही ठेवल्याचं सांगितलं जात आहे ... खरं तर देशातील राजकारणात भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी विरोधी पक्षांच्या नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस () पक्षाचा काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये याबाबत विचार मंथन सुरूही झालं आहे या चर्चांना आणखी बळ मिळाले ते काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिल्लीत बोलावल्यामुळे. त्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही दिल्लीला पाचारण करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.... दिल्लीला जाण्याआधी नाना पटोले यांनी एक सूचक प्रतिक्रियाही दिली आहे “राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव ऑलरेडी पवार साहेबांनी दिला होता. मात्र, काही कारणास्तव त्यावर निर्णय घेण्यास उशीर झाला. आता देशातील राजकारणात जे काही चाललं आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चालली आहे. अशावेळी सेक्युलर मतांचं विभाजन थांबवण्यासठी, देश वाचवण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी , जे काही सेक्युलर विचारांचे पक्ष आहे, त्यांनी एकत्रित यावे, अशी प्रक्रिया सुरु झाली आहे.” तसेच भाजपविरोधात व्यापक आघाडी उभारण्यासाठी विविध समविचारी पक्ष काँग्रेससोबत येण्याच्या भूमिकेत असल्याचेही पटोले यांनी म्हटलं आहे..... म्हणजेच या विलीनीकरणाची गतिमान होत असल्याचे संकेत नाना पटोले यांनी दिले आहेत.... शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही भाजपाला प्रभावी आव्हान द्यायचं असेल तर शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, विरोधी मतांचे एकत्रीकरण करावं आणि काँग्रेस मधून वेगळी झालेली समविचारी पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये एकत्र यावेत असं म्हटलं आहे...... महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड घडत असल्याचं एका बाजूला दिसत असलं तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र सावध भूमिका घेतल्याचे दिसत.... नाना पटोले यांनी एवढ्या स्पष्टपणे सांगितलं असताना दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र काँग्रेसकडून असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केला आहे तर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी ........ विलीनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असं म्हटलं आहे... पण त्यांनी विलीनीकरणाची चर्चा नाकारलेली मात्र नाही..... अंतिम निर्णय शरद पवार हेच घेतील हे उघड आहे पण ही चर्चा खोटी आहे चुकीची आहे.. काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कोणताही विषय नाही असं काही या नेत्यांनी म्हटलं नाही याचाच अर्थ असा की राष्ट्रवादीच्या नदीचा प्रवाह काँग्रेसच्या सागराच्या दिशेने सुरू झालेला आहे.... त्यामुळे महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचा गायब होणार आहे......

Rohit Pawar LIVE | रोहित पवार यांच्या आंदोलन ठिकाणी रणजित बागल यांची तुफान भाषण | Annatyag Andolan

Sanjay Raut LIVE | संजय राऊतांची पत्रकार परिषद लाईव्ह | Lokshahi Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Coming To Israel 🇮🇱🇮🇳 छत्रपति शिवजी पर इजराइल का दुनिया हिलाने वाला ऐलान

Mumbai White Line Issue सांस्कृतिक दहशतवादापर्यंत कसा गेला? Prasad Vedpathak यांचं म्हणण काय ?

Kumar Ketkar Interview: या नव्या सरकारी रेकॉर्डचा इतका गवगवा का सुरु आहे?

Iran vs Israel : Donald Trump यांचा Netanyahu यांच्यावर संताप, इराणच्या चक्रव्युहात दोन्ही देश अडकले

ਇਹ ਵਿਦਰੋਹ ਨਾਲ ਪੂਰੇ ਇੰਗਲੈਂਡ ਤੇ ਵੱਡਾ ਦਬਾਅ... ਵਿਦਰੋਹ ਪਿੱਛੇ ਕਿ ਰਹੇ ਕਾਰਨ northern ireand protest

Pawan Kalyan Unfiltered: Politics, Spirituality, Gen Z, Movies, Modi & More | ANI Podcast | EP-422

सयानी सयोनी-घोष होती, चड्डी बन गयी?

एकनाथ शिंदेंचे दिवस भरले ? | Bhau Torsekar | Pratipaksha

Part 2: भगवान श्रीकृष्ण स्वतः वर मागतात तेव्हा.. | Boys Talk | Nilesh Oak | Maithily Apte | AarPaar

BREAKING: Judge rules Trump's name must be removed from the Kennedy Center

मायकल डिसोजा यांची प्रेस | लावला ऑडिओ | Michael D'Souza

U.S. and Iran signal a peace deal is close

Sanjay Raut Interview: का फुटतो आहे ममता बॅनर्जी यांचा पक्ष ?

Mystery Behind Sridevi’s Death! | Pooja Samant | Sarva Kaahi Clips

Chandrababu Naidu | Mamata Banerjee । The Rajneeti | West Bengal | Rahul Gandhi | Eknath Shinde

भाजपा विरोधक आणि त्यांच्या समर्थकांनाही सतावणारे अजब कोडे !अर्थात देवेंद्र फडणवीस | Bhau Torsekar

धक्कादायक गौप्यस्फोट ; ठाकरेंचे नेते भास्कर जाधव यांचा भाजपवर हल्लाबोल ? ब्रेकिंग #maharashtranews

