Sachin Goswami | Rashtra Seva Dal | Hindutva Politics | Communalism #rashtrasevadal
#hasyajatra #uddhavthackeray #shivsenaubt #maharashtrapolitics #eknathshinde #narendramodi #rss #hindutvapolitics #hindu #ambedkarsahebji #rashtrasevadal समाजातील बदलत्या परिस्थितीत केवळ टीका करून उपयोग नाही, तर सक्रिय सहभागातूनच परिवर्तन घडवावे लागेल आणि यासाठी राष्ट्र सेवा दलासारख्या संघटनांनी सक्रिय होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असे प्रतिपादन सिने दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी केले. राष्ट्र सेवा दलाच्यावतीने आयोजित क्रियाशील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. संपादक संजय आवटे, माजी विश्वस्त प्रकाश परांजपे, झेलम परांजपे, माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे, महाराष्ट्राचे माजी कार्याध्यक्ष राजा अवसक हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी युवराज मोहिते हे होते. गेल्या काही वर्षांत न्यायव्यवस्था, पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्राने आपली जबाबदारी पुरेशी पार पाडलेली नाही, अशी खंत व्यक्त करत गोस्वामी यांनी सांगितले की, अनेक कलाकारांच्या मनात ही अस्वस्थता असूनही ते मोकळेपणाने व्यक्त होऊ शकत नाहीत. त्यामुळे समाजात एक प्रकारची भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंधश्रद्धा आणि चुकीच्या माहिती विरोधात सातत्याने जनजागृती करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी कार्यकर्त्यांनी केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता ठोस कार्यक्रम राबवावेत, असे आवाहन केले. “प्रत्येक कार्यकर्त्याकडे क्षमता असते, मात्र त्यांना योग्य दिशा आणि नियोजनाची आवश्यकता असते,” असे ते म्हणाले. विविध विचारांच्या लोकांशी संवाद साधत त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणे महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक माध्यमांच्या प्रभावावरही भाष्य केले. “आजच्या काळात सांस्कृतिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनच प्रभावीपणे विचार पोहोचवता येतो,” असे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे मालक नसून विश्वस्त आहेत, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारणे ही लोकशाहीची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकारच्या कार्यक्रमांमधून व्यापक सामाजिक चळवळ उभी राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

From Drishyam's Inspector Gaitonde to the Real Kamlesh Sawant | A Candid Conversation | Mitramhane

दोन चिनी राजपुत्रांमुळे भारतात पेर आले | Mohasina Mukadam | Woman Ki Baat | AarPaar

Mumbai Tak Baithak:राजकारण अन् नेते, राजदीप सरदेसाई, गिरीश कुबेर, मिलिंद खांडेकर,साहिल जोशींची चर्चा

Tamilnadu CM C. Joseph Vijay ने 2 महिन्यात घडवला बदल, Thalapathy Vijay pattern ची Maharashtra ला गरज

अमेरिकेने जगात दबदबा कसा निर्माण केला? । Dr. Sankalp Gurjar | Think Bank

न्यायमूर्तींना शिव्या का मिळतात? असीम सरोदे यांची स्फोटक मुलाखत

'बघून घेतो' म्हणणारे मुख्यमंत्री चुकीचे, करमुसेला मारणारे 'आव्हाड' मात्र योग्य?

Raju Parulekar: Sanjay Raut अटकेआधी नेमकं काय घडलं? धक्कादायक!

ताई दादा अक्का नवा पक्ष पक्का | Sushil Kulkarni | Analyser | Rohit Pawar | Sushma Andhare

राम मंदिरातील चोरीची संपूर्ण कहाणी! कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांच्या जुबानी! पहिल्यांदाच मराठीत

तेव्हापासून महाराष्ट्र आतून किडत गेला; राजू परुळेकरांनी उद्ध्वस्त महाराष्ट्राचा आलेखच मांडला

मुलगा असक्षम, सासरच्यांचे अघोरी उपचार,Girija Raut यांचे Vinayak Raut,Gitesh Raut यांच्यावर आरोप काय?

The Biggest Myth About Pandharpur Wari! | Nilamtai Wadghule | Marathi Podcast

Raj Thackeray Speech : मिसिंग लिंक, हिंदीतून भाषण ते फडणवीसांची मिमिक्री, राज ठाकरेंचे आक्रमक भाषण

दिल्लीच्या गळ्यात पडण्याची महाराष्ट्राला सवय|डॉ.दीपक पवार |Marathi| Language Politics|

सुप्रीम कोर्ट के जज justice Dhuliya और Kapil Sibal ने नागरिकता मामले पर किया गजब विश्लेषण!

संविधानाला सर्वात मोठा धोका: राजू परुळेकरांचा गंभीर इशारा | Raju Parulekar

काट्याच्या अणीवर वसले तीन गाव दोन ओसाड एक वसेचिना | Bhau Torsekar | Pratipaksha

"आपण माणसं राहिलोय का?" | गिरीश कुलकर्णी | शिक्षणतज्ज्ञ सौ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमाला

